Ads Area

भारतीय इतिहास प्रश्न उत्तर

 भारतीय इतिहास प्रश्न उत्तर

तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा तयार केली आहे जी आगामी स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात एसएससी, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा, रेल्वे परीक्षा जसे की एनटीपीसी आणि ग्रुप डी इत्यादी कोणत्याही परीक्षेप्रमाणेच. सरळसेवा परीक्षेसाठी सामान्य जागरूकता आणि भारतीय इतिहास  हा विषय महत्त्वाचा आहे.




स्पर्धा परीक्षेत एकाग्रता असली पाहिजे, तरच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. यासाठी अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.

'यंग इंडिया' हे वर्तमान पत्र कोणी सुरू केले होते ?

=> महात्मा गांधी

लोकमान्य टिळकाच्या तुरुंगवासाच्या काळात टिळकांची वृतपत्रे कोणी सांभाळली ?

=> न ची केळकर आणि कृष्णाजी खडीलकर

भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधि हजर होते?

=> 72
मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?

=> मुंबई
२८ डिसेंबर १८८५

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते ?

=> व्यअमेश चंद्र बॅनर्जी

'ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ'या संस्थेची स्थापना कोणी केली ?

=> महर्षि कर्वे
१९३६ मध्ये कर्वेनी "महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ" या संस्थेची स्थापना केली.

1919 च्या कायद्याचा प्रमुख उद्देश/हेतु काय  होता ?

=> गव्हर्नर जनरल चे अधिकार अधिक व्यापक करणे

'मद्रास महाजन सभा' या संस्थाची स्थपणा कोणत्या वर्षी झाली ?

=> 1884
'मद्रास महाजन सभा' संस्थापक पलवई रंगैया नायडू यांनी केली

1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्य युद्ध' असे उद्ग़ार कोणी काढले होते ?

=> वी. दा. सावरकर

लॉर्ड कर्झनने १९०५ साली बंगालची फाळणी कशासाठी केली होती ?

=> 1.)प्रशासणाच्या सोयीसाठी 2.)राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी 3.)अन्य भाषिक प्रदेश वेगळा करण्यासाठी
लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय कॉंग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्य सभासद कोण होते ?

=> राजकरणामुळे भडकलेले विद्यार्थी

सन 1985 मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारावर एक महत्वपूर्ण अभ्यास कोणी प्रसिद्ध केला ?

=> निर्मला बॅनर्जी

व्यक्तिगत सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता?

=> दुस·या महायुध्दात सामील न होण्याचा

स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?

=> रयत शिक्षण संस्था

कोणाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते?

=> गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे दिनांक १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला. गोपाळरावांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे पराक्रमी सेनापती गोखले यांचे फडणीस होते. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?

=> गोपाळ गणेश आगरकर.

पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली.?

=> गणेश वासुदेव जोशी
स्थापना 2 April 1870

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

=> फर्ग्युसन कॉलेज
टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली

11➤ 1942 च्या "चलेजाव आंदोलनाचे" महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते

=> मुंबई

देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे. असे . . . यांनी म्हटले आहे ?

=> विठ्ठल शिंदे

सन 1857 च्या काळात हिंदुस्तानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत?

=> दक्षिण भारत /हिंदुस्थान

नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली आहे?

=> जोतिबा फुले

सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती . . . . साठी प्रसिध्द होती?

=> शारीरिक शिक्षण
अनुशीलन समिती : विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था. संस्थेच्या कार्याचा काही भाग उघड चाले, तर काही पूर्णपणे गुप्त असे

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area