Ads Area

RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, बँकेचे प्रमुख उद्देश, RBI चे कार्य आणि इतर माहिती

 RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना

  1. RBI स्थापना भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली, 
  2. ज्याला हिल्टन-यंग कमिशन म्हणूनही ओळखले जाते.
  3. १९२६ मध्ये हिल्टन बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ' दि रॉयल कमिशन इंडियन करन्सी आणि फायनान्स' या आयोगाने मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली
  4. या नुसार १ एप्रिल १९३५ रोजी आर. बी. आय. ची स्थापना झाली.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली, ज्याला हिल्टन-यंग कमिशन म्हणूनही ओळखले जाते.
  5. भारत ब्रह्मदेश हे आर. बी.आय. चे कार्यक्षेत्र होते. मात्र १९४२ पर्यंत आर.बी.आय. ब्रम्टेश चलन नियंत्रित करीत होती.
  6. RBI . चे राष्ट्रीयीकरण : १ जानेवारी १९४९
  7. RBI . चे मुख्यालय मुंबई
  8. RBI चे पहिले गव्हर्नर श्री. ऑसबॉर्न अर्कल स्मिथ
  9. सर्वाधिक काळासाठी आर.बी.आय. चे गव्हर्नर बेनेगल रामाराव (१९४९ ते १९५७)
  10. RBI ची विभागीय कार्यालये २२ विभागीय कार्यालये आहेत.
  11. RBI  ची महाराष्ट्रात तीन विभागीय कार्यालये आहेत.
  12. मुंबई ,बेलापूर (नवी मुंबई) ,  
  13. नागपूर आर.बी.आय. चे जमा-खर्चाचे वर्ष १ जुलै ते ३० जून
  14. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. 
  15. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते.
  16.  सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते 
  17. स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.  
  18. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले

भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
  • भारताची गंगाजळी राखणे.
  • भारताची आर्थिक स्थिती राखणे.
  • भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

 आर.बी.आय.ची कार्य

१. आर.बी.आय. ही देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते.
२. आर.बी.आय. बँकांची बँक म्हणूनही काम करते.
३. चलननिर्मिती व पतनियंत्रण हे आर.बी.आय. चे सर्वात महत्त्वाचे काम आहे.


 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area